पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

13) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्मयोग प्रारंभ

इमेज
 माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेेेश्वरी 13) कर्मयोग प्रारंभ तृतीयोऽध्यायः- कर्मयोग या अध्यायात आपण समजून घेणार आहोत:- ज्ञानयोग आणि कर्मयोग करून अनासक्त भाव ठेवून नियत कर्म करण्याची आवश्यकता, यज्ञ कर्म का आवश्यक आहे आणि यज्ञाची महिमा, ज्ञानी, जेष्ठ आणि भगवंत यांनी सुद्धा नियत कर्म का करावीत याविषयी मार्गदर्शन, अज्ञानी आणि ज्ञानी यातील फरक आणि राग द्वेष विरहित कर्म करण्यासाठी प्रेरणा, सर्व अनिष्टांचे कारण असलेल्या काम रुपी शत्रू ला नष्ट करण्यासाठी उपदेश. भूमिका अध्याय दोन मधील भगवंताचा संदेश ऐकून अनेक जण भ्रमित होतांना दिसतात आणि अशीच अवस्था अर्जुनाची सुद्धा झाली आहे कारण भगवंतांनी प्रथम स्वधर्मानुसार कर्म करण्याचा मार्ग दाखवला आणि नंतर स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगून स्थितप्रज्ञ म्हणजेच स्थिरबुद्धी होण्याचं सल्ला दिला. त्यामुळे भ्रमित झालेला अर्जुन तुमच्या माझ्या मनातील शंका प्रश्न रूपात भगवंतासमोर मांडतो भाग १ ज्ञानयोग आणि कर्मयोग करून अनासक्त भाव ठेवून नियत कर्म करण्याची आवश्यकता अर्जुन उवाच : ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव...

12) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- स्थितप्रज्ञ / स्थिर बुद्धी व्यक्तीची लक्षणे आणि वैशिष्ट्ये

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 12) स्थितप्रज्ञ / स्थिर बुद्धी व्यक्तीची लक्षणे आणि वैशिष्ट्ये अर्जुन उवाच: स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥२.५४॥ अर्जुन म्हणाला: हे कृष्ण ज्याची भावना समाधिस्त झाली आहे त्या व्यक्तीला कसे ओळखावे, त्याची लक्षणे कोणती आहेत?, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? त्याचे वर्तन बसणे चालणे कसे आहे? श्रीभगवानुवाच : प्रजहाति यदा कामान् सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मयेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥२.५५॥ दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥२.५६॥ यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥२.५७॥ यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गनीव सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥२.५८॥ विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्टवा निवर्तते ॥२.५९॥ यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२.६०॥ तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः । वशे हि यस...

11) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्मयोग काय आहे? याविषयी मार्गदर्शन

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी कर्मयोग काय आहे? याविषयी मार्गदर्शन एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु । बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥२.३९॥ नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवातो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥२.४०॥ जगातील परम सत्याची सांख्य / पृथकरणात्मक म्हणजेच विश्लेषणात्मक माहिती दिल्यानंतर भगवंत कृष्ण अर्जुनाला म्हणतात कि आता मी तुला निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो. आणि जर तू या ज्ञानाच्या आधारे कर्म केले तर तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. या मार्गाचा विलंब केल्याने कोठेही नुकसान किंवा ह्रास होत नाही, याउलट या मार्गावर केलेली थोडीशी प्रगती सुद्धा व्यक्तीचे महान भयापासून संरक्षण करू शकते. वाचक मित्रांनो श्रीमद भगवद्गीतेचे सार असलेल्या या अध्यायातील प्रत्येक टप्प्यावर अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन मिळतांना आपणास दिसत आहे. आता या भागात सध्याच्या जगात पसरलेले भय, निराशा, भीती, तणाव यावर मुक्तीचा हा रामबाण उपाय आपल्याला या टप्प्यात पाहावयास मिळत आहे. तरी माझी वाचक गण व श्रोते गणास विनंती आहे कि भगवद्गीता अध्याय २ हा आप...

10) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करण्याच्या आवश्यकतेचे वर्णन

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 10) क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करण्याच्या आवश्यकतेचे वर्णन मृत्यू हेच जर अंतिम सत्य आहे तर मग कशाला काही करायचे? एक दिवस जर मारायचे आहेच तर मग मजा करूया असा युक्तिवाद करत अनेक जण आळसाला जवळ करत नित्य नियत कर्म न करण्याचे समर्थन करताना दिसतात. पण या भागात आपल्याला लक्षात येईल कि नेमकं काय करणे अपेक्षित आहे आणि भगवंतानी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार या अमूल्य अश्या मानव जीवनाचा पुरेपूर उपयोग जीवनात समाधान व यश प्राप्ती आणि मोक्ष (अंतिम ध्येय) प्राप्तीसाठी कसा करता येईल. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥२.३१॥ वरील श्लोकात भगवान अर्जुनाला सांगतात की क्षत्रिय या नात्याने धर्मतत्वांसाठी युद्ध करणे या व्यतिरिक्त इतर कोणतेही श्रेष्ठ कर्तव्य (कर्म) नाही. म्हणजेच आपल्या धर्मानुसार नित्य नियत कर्म करण्याचा उपदेश भगवंत करतांना दिसून येत आहेत. आता इथे धर्माची व्याख्या मानवनिर्मित गृहीत न धारता भगवंताच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लक्षात घेणे आवश्यक आहे. अनॆक मनुष्य आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी जन्म...

9) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवद्गीता रूपाने जीवनातील परम सत्य कथन व सांख्य योग (वैश्लेषिक विवरण)

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 9) भगवद्गीता रूपाने जीवनातील परम सत्य कथन व सांख्य योग (वैश्लेषिक विवरण) इथून पुढे सांख्य योग (वैश्लेषिक विवरण) सांगण्यास भगवंत सुरुवात करत आहेत. यात जीवनाची मूळ मूल्ये आणि सत्य सांगण्यात आली आहेत. इथे महाभारतातील एका घटनेतील यक्ष आणि युधिष्ठीर यांच्या संवादातील एक अतिशय उत्तम व महत्वपूर्ण प्रश्न समोर सादर करत आहे, आपल्या चारही भावंडांच्या जीवनप्राप्तीसाठी धर्मराज युधिष्ठीर यांना यक्षाने अनेक प्रश्न विचारले होते त्यापैकी हा प्रश्न सांख्ययोग समजून घेण्यापूर्वी एकदा नजरेसमोरून जावा असे मला वाटते. यक्ष: या जगातील कोणती गोष्ट तुम्हाला ज्यास्त आश्चर्यकारकक वाटते? युधिष्ठीर: जगातील प्रत्येक मनुष्य, दररोज अनेकानेक प्राणी व जीवजंतूंचा मृत्यू होताना पाहत असतो तरीही मनुष्य अमर होण्याची स्वप्न पाहत असतो आणि जीवन कधीच संपणार नाही या अविर्भावात जगत असतो. वाचकांना मला काय सूचित करायचे आहे हे कळले असेल अशी आशा करून मी भगवंताची वाणी पुढे कथन करायला सुरुवात करते. श्री भगवानुवाच : अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डि...

8) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-अर्जुन भगवंताला शरण जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो; जीवनात प्रगतीचा राजमार्ग

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 8) अर्जुन भगवंताला शरण जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो अर्जुन उवाच, न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो - यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषाम-  स्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥२.६॥ कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः । यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे  शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥२.७॥ न हि प्रपश्यामि ममापनुद्या-  द्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् । अवाप्य भूमावसपत्रमृद्धं-  राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥२.८॥ हा कोणत्याही ज्ञानार्थी शिष्यासाठी अतिशय महत्वाचा श्लोक आहे असे माझे मत आहे, या श्लोकात अर्जुन पूर्ण समर्पण करून भगवंताचे शिष्यत्व घेऊन योग्य मार्गदर्शनाची प्रार्थना करतांना दिसतो. इथे अर्जुनाची भूमिका समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जुन म्हणाला, हे माझ्या मनाच्या दुर्बलतेमुळे माझी स्मृती नष्ट झाली आहे, मला काय योग्य आणि काय आयोग्य याचे भान राहिलेले नाही त्यामुळे, हे मधुसूदन कृपया मला आपला शिष्यत्व देऊन माझ्यासाठी काय योग्य आहे याचे मार्गदर्शन करावे. वाचक मित्रांनो जीवनात प्रगतीचा राजमार...

7) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अथ द्वितीयोऽध्यायः ~ सांख्ययोग गीतेचे सार, प्रारंभ

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 7) अथ द्वितीयोऽध्यायः ~ सांख्ययोग गीतेचे सार भूमिका मागील अध्यायाच्या शेवटी आपण पहिले कि परिस्थिती, मनस्थिती आणि भावनांच्या आधारे अर्जुन मार्गभ्रष्ट होत आहे आणि आता खरा कृष्ण-अर्जुन संवाद सुरु होत आहे. आतापर्यंत आपण हे पहिले कि मार्गदर्शक हा नेहमी शांत चित्ताने ऐकून घेणारा असतो जसे भगवद्गीता अध्याय १ मध्ये आपण भगवान कृष्णाला केवळ एक दर्शक व श्रोता रूपातच पहिले आणि हिच खरी शिकवण घेण्याची गरज आहे. आपण कदाचित एक मित्र असाल, पालक, शिक्षक किंवा मार्गदर्शक असाल या सगळ्या भूमिकेत पहिली पात्रता शांत चित्ताने ऐकून घेण्याचीच आहे, हेच भगवंतांनी त्यांच्या कृतीने दाखवून दिले आहे. इथे- जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः । ४:९ । चा आधार घेऊन आपण जाणून घेऊया. स्वयं भगवंतांनी सांगितले आहे कि जो कुणी माझ्या जन्म आणि कर्मांची दिव्यता जाणतो तो मला प्राप्त होतो. म्हणजेच श्रीभगवान कृष्णाच्या जन्मप्रवासाचे व वेगवेगळ्या परिस्थितीत, भूमिकांमध्ये भगवंतांनी केलेल्या कर्मांचे अध्ययन केले कि आपल्याला कळते कि आपण विशिष्ट परिस्थितीत कसे आचरण केले पाहिजे याचे सोदाहरण...

6) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अर्जुन विषाद

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 6) अर्जुन विषाद अध्याय १, श्लोक २८ ते  ४६ मध्ये अर्जुन ची मनस्थिती आणि विषाद आजच्या संदर्भात जाणून घेऊ. अर्जुन उवाच : दृष्टेवमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥१.२८॥ सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति । वेपथुश्च शरीरे में रोमहर्षश्च जायते ॥१.२९॥ गाण्डीवं स्रंसते हस्तात्वक्चैव परिदह्यते । न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥१.३०॥ निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥१.३१॥ न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च । किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा ॥१.३२॥ येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥१.३३॥ आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः । मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥१.३४॥ एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥१.३५॥ निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ॥৷१.३६॥ तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् । स्...