पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

74) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात - तीन प्रकारचे कर्म

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 74) तीन प्रकारचे कर्म  नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम। अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते৷৷१८.२३৷৷ यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः। क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्৷৷१८.२४৷৷ अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम् । मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते৷৷१८.२५৷৷ आता आपण तीन प्रकारचे कर्म समजून घेऊया. भगवंत म्हणाले. जे कर्म नियत कर्म आहे म्हणजेच कर्तव्य भावनेने उत्पन्न झाले आहे. जे करतांना कोणतीही फलाची आसक्ती नाही आणि त्या कर्माशी कोणतेही राग अथवा द्वेष भाव नाहीत अश्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. आणि जे कर्म निश्चित फल प्राप्तीसाठी मोठयाप्रमाणात अविरत श्रम घेऊन मी हे करणार, मी ते करणार ह्या अहंकार भावाने केले जातात त्या कर्माला राजसी कर्म असे म्हणतात. लोभ आणि मोह ज्याचा पाय आहे आणि जे शास्त्राच्या तत्वांना डावलून परिणामांकडे दुर्लक्ष करून हिंसा ( मानसिक तथा शारीरिक ) दुसऱ्यांच्या भावनां दुखावणारे ई कर्म हे तामसी कर्म जाणावेत. ।।जय श्री कृष्णा।। धन्यवाद🙏🏻😇 निशा सुजाता राजेश्वर चान्ने भाग 73) तीन गुणानुसार ज्ञान, कर्म, कर्ता...

73) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- तीन गुणानुसार ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृति आणि सुख चे पृथक-पृथक भेद

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 73) तीन गुणानुसार ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृति आणि सुख चे पृथक-पृथक भेद ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः । प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावच्छ्णु तान्यपि ৷৷१८.१९৷৷ सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते । अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ৷৷१८.२०৷৷ पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् । वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् ৷৷१८.२१৷৷ यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम्।  अतत्त्वार्थवदल्पंच तत्तामसमुदाहृतम्৷৷१८.२२৷৷ आपल्या माहीत असलेल्या प्रकृतीच्या तीन गुणांना (  सत्, रज, तम ) अनुसरूनच ज्ञान, कर्म आणि कर्ता हे तीन-तीन प्रकारचेच सांगितले आहेत. ते तू आता  माझ्याकडून नीट ऐक.  ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व जीवांमध्ये एक अविनाशी परमात्माच समभावाने पाहतो ते ज्ञान तू सात्त्विक जाण. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व जीवांमध्ये आपल्या मतानुसार आणि गरजेनुसार भिन्न भिन्न प्रकारे उपभोग किंवा उपयोग करण्याच्या दृष्टीने पाहतो वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस जाण. परंतु जे ज्ञान मनुष्याला जगाविषयी अनभिज्ञ होऊन को...

72) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्मसिद्धीसाठी पाच कारणे

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 72) कर्मसिद्धीसाठी पाच कारणे पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे । साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ৷৷१८.१३৷৷ अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ৷৷१८.१४৷৷ शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः । न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः৷৷१८.१५৷৷ तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः । पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ৷৷१८.१६৷৷ यस्य नाहङ्कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते । हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ৷৷१८.१७৷৷ ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना । करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसङ्ग्रहः ৷৷१८.१८৷৷ भागवन्त पुढे सांगतात हे महाबाहो अर्जुन! सांख्य योगात कर्मसिद्धीसाठी एकूण पाच कारणे सांगितलेली आहेत. ती आत तू मझ्याकडून नीट जाणून घे. या कारणांमध्ये प्रार्थं अधिष्ठान म्हणजे हे भौतिक शरीर, दुसरे कर्ता प्रकृतीच्या तीन गुणांद्वारा ( 3:27 ) कर्म करणारी कर्मेंद्रिये, तिसरे करणम् म्हणजे आपल्याला माहिती पुरवणारी ज्ञानेंद्रिये, ज्यांच्या मानसोबतच्या संयोगाने कर्म करण्य...

71) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- त्यागाचे प्रकार

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 71) त्यागाचे प्रकार नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते । मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ৷৷१८-७৷৷ दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् । स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ৷৷१८-८৷৷ कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेअर्जुन । सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ৷৷१८-९৷৷ न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते । त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ৷৷१८-१०৷৷ न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः । यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ৷৷१८-११৷৷ अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् ।  भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् ৷৷१८-१२৷৷ आता भगवंत त्यागाचे प्रकार सांगतात, भगवंत म्हणतात, नियत कर्माचा कधीही त्याग करू नये. जेव्हा मनुष्य मोहास बळी पडून जसे कि आळस, निद्रा ई. साठी नियत कर्माचा त्याग करतो तेव्हा या त्यागाला तामसी त्याग असे जाणावे. जेव्हा मनुष्य नियत कर्माना कर्माच्या कठिणतेपोटी किंवा त्यासाठी लागणारे कष्ट किंवा उचलावा लागणारा त्रास याच्या चिंतेने भय अथवा चिंताग्रस्तच होऊन नियतकर्माचा त्या...

70) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- त्याग आणि संन्यास

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 70) अध्याय १८ मोक्षसंन्यास योग त्याग आणि संन्यास अर्जुन उवाच; सन्न्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् । त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ৷৷१८-१৷৷ काम्यानां कर्मणा न्यासं सन्न्यासं कवयो विदुः । सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ৷৷१८-२৷ त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः । यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ৷৷१८-३৷৷ निश्चयं श्रृणु में तत्र त्यागे भरतसत्तम । त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ৷৷१८-४৷৷ यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् । यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ৷৷१८-५৷৷ एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च । कर्तव्यानीति में पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ৷৷१८-६৷৷ अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे हृषीकेश, हे केशीनिसुदन, मला त्याग आणि संन्यास तत्वत: जाणण्याची इच्छा आहे. अध्यायात पुढे जाण्याआधी अर्जुनाने हा प्रश्न का विचारला याविषयी समज वाढवणे गरजेचे आहे. अनेक वाचकरूपी पार्थ श्रीभगवान कृष्णाची वाणी असलेली श्रीमदभगवद्गीता वाचन तर करतात, पण संसार आणि भगवद्भक्ती याच्या द्वंद्वामध्ये फसतात. एका बाजू...

69) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- ॐ तत्‌ सत्‌ ची माहिती आणि महात्म

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः । ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ १७-२३ ॥ तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः । प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ १७-२४ ॥ ॐ तत्‌ सत्‌ ची माहिती आणि महात्म आता आपण ॐ तत्‌ सत्‌ अशी तीन प्रकारची परमात्म्याची नावे आणि त्यांचा वापर समजून घेऊया. याआधीच भगवंतांनी सांगितले आहे कि अनन्य भक्ती हाच मनःस्वास्थ मनशांती आणि प्रगती म्हणजेच भगवद्भक्तीचा सहज, सुंदर आणि सोपा मार्ग आहे. मनुष्य जेंव्हा नानाविविध कर्में करत असतो जसे कि आहार, विहार, यज्ञ, दान, तप तेव्हा तो त्रिगुणांनी बांधला जातो आणि या बंधातून मुक्तीचा सोपा मार्ग म्हणजेच सर्व काही भगवंताला अर्पित करायचे आणि त्याची विधी भगवंतांनी इथे सांगितली आहे. भगवंत सांगतात कि सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच ॐ तत्‌ सत्‌ हे तीन शब्द अंतिम परमसत्य दर्शविण्यासाठी वापर केले जाते. ब्राह्मण वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या परमपुरुषांचा शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तप रूप क्रियांचा नेहमी ॐ या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ करतात. म्हणजेच ...

68) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- दान आणि दानाचे प्रकार

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 68) दान आणि दानाचे प्रकार दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे । देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ १७-२० ॥ यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः । दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥ १७-२१ ॥ अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते । असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥ १७-२२ ॥ आता आपण दान आणि दानाचे प्रकार समजून घेऊया, भगवंत सांगतात कि दान सुद्धा तीन प्रकारचे आहेत. ते जाणण्याआधी वाचकरूपी अर्जुनास आचरण संबंधी सूचनावजा विनंती. आहार, यज्ञ, तप व दान याचे तीन प्रकार समजून योग्य आचरण करणारी व्यक्ती नक्कीच चांगले चित्त, चांगली नाती, चांगले आरोग्य उपभोगून मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगतीस प्राप्त होतो.  दानाविषयी भगवंत सांगतात, केवळ कर्तव्य म्हणून स्वामित्वाच्या भावाशिवाय, योग्य वेळी, योग्य स्थळी, योग्य ( पात्र ) व्यक्तीला कोणत्याही परताव्याची आशा न ठेवता दिलेले दान हे सात्विक दान ओळखावे. म्हणजेच योग्य दान ही निश्चयपूर्वक करावयाची गोष्ट आहे. योग्यता पारखूनच दान द्यावे. भगवंत पुढे सांगतात, परतफेडीची अपेक्षा ठेवून , किंवा दानयोगातून वि...

मनोगत- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

1)- मनोगत https://nisha-channe.blogspot.com/2021/05/1.html?m=1 2)-मांडणी, अभ्यासाची गरज आणि पात्रता http://nisha-channe.blogspot.com/2021/05/blog-post.html

अथ प्रथमोऽध्यायः- अर्जुन विषाद योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

अथ प्रथमोऽध्यायः- अर्जुन विषाद योग http://nisha-channe.blogspot.com/2021/05/blog-post_7.html दोन्ही बाजूच्या सैन्याचे आणि योध्यांचे वर्णन आणि शंख-ध्वनि वर्णन व त्याचा परिणाम http://nisha-channe.blogspot.com/2021/05/blog-post_21.html पार्थद्वारे (अर्जुनाद्वारे) सैन्य निरीक्षण आणि संजय द्वारा प्रसंग वर्णन https://nisha-channe.blogspot.com/2021/05/5.html?m=1 अध्याय १, श्लोक २८ ते ४६ मध्ये अर्जुन ची मनस्थिती आणि विषाद आजच्या संदर्भात जाणून घेऊ. http://nisha-channe.blogspot.com/2021/05/6.html

67) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- तप आणि तपाचे तीन प्रकार

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 67) तप आणि तपाचे तीन प्रकार देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् । ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १७-१४ ॥ अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् । स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १७-१५ ॥ मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः । भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १७-१६ ॥ श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः । अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७-१७ ॥ सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत् ।  क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ॥ १७-१८ ॥ मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।  परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १७-१९ ॥ आता भगवंत तप आणि तपाचे तीन प्रकार याविषयी मार्गदर्शन करतात.   भगवंत सांगतात देव, ब्राह्मण, मार्गदर्शक गुरू व जेष्ठ ज्ञानी यांची पूजा करणे, तसेच पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा आचरण ह्या सर्वाना शारीरिक तप म्हटले जाते. शरीराप्रमाणे वाणीचा संयम म्हणजेच तप सुध्दा अतिशय महत्वाचे आहे आणि भगवंत सांगतात कि जे दुसऱ्याला न हिणवणारे, सत्यप्रिय, हितकारक शब्दप्रयोग, तसेच वेदशास्त्रांचे पठण...

66) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- तीन प्रकारच्या यज्ञाबद्दल माहिती

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 66) तीन प्रकारच्या यज्ञाबद्दल माहिती अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते । यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ १७-११ ॥ अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् । इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥ १७-१२ ॥ विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् । श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १७-१३ ॥ आता भगवंत तीन प्रकारच्या यज्ञाबद्दल माहिती देतात, भगवंत म्हणाले कि श्रीमदभगवद्गीता अध्याय २ श्लोक ९ ते १६ मध्ये आपण यज्ञ आणि यज्ञाची महिमा जाणून घेतली. मित्रानो आपण आयुष्यात धेय्य प्राप्तीसाठी विविध यज्ञ करत असतो आणि या यज्ञाचे हे तीन प्रकार आपल्याला नेमका कोणता यज्ञ इष्ट आहे याबाबत मार्गदर्शन करतात तर आपण श्रीकृष्ण भगवंतापासून तीन प्रकारचे यज्ञ समजून घेऊया. भगवंत सांगतात, शास्त्रात वर्णित विधीनुसार तसेच फळाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य म्हणून जो यज्ञ केला जातो तो इष्ट म्हणजेच सात्विक यज्ञ होय. निष्काम कर्म करण्याचे इथे पुन्हा एकदा भगवंतांनी सांगितले आहे. याविरुद्ध शास्त्रातील पद्धतीला न वापरता, प्रसाद वितरित न करता, म्हणजेच भगवंताला यज्ञफळ ...

65) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- आहाराचे तीन प्रकार

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 65) आहाराचे तीन प्रकार आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः । यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ॥ १७-७ ॥ श्लोक ७ ते १० मध्ये भगवंत आहाराचे तीन प्रकार सांगत आहेत जसे सतो, रजो, तमो गुण आहेत तसेच सत, रज, तम प्रकारचे आहार सुद्धा इथे वर्णित आहे. यासोबतच यज्ञ, तप व दान याच्या तीन प्रकारची माहिती भगवंत श्लोक ११ ते २२ मध्ये देतात. श्रीभगवान म्हणाले, भोजनही, भोजन करणाऱ्याच्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे असते. आणि तसेच यज्ञ, तप व दानही तीन तीन प्रकारची आहेत. त्या सर्वांची वैशिष्ट्ये आणि भेद आता तू माझ्याकडून ऐक. आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ १७-८ ॥ कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः । आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ १७-९ ॥ यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् । उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥ १७-१० ॥ ज्या भोजनाद्वारे आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढते असे, रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि ह्रदयाला स्वास्थ आणि संतुष्टी देणारे भोजन सात्त्विक पुरुषांना ...

64) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रध्देचे तीन प्रकार

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 64) श्रध्देचे तीन प्रकार अध्याय १७ श्रद्धात्रय विभाग योग भूमिका अध्याय १६. श्लोक १७ मध्ये अविधीपूर्वक यज्ञ करणाऱ्यांना भगवंतानी दंभ म्हंटले आहे आणि हे जाणून घेतल्यानंतर अर्जुनाच्या मनात स्वाभाविक प्रश्न आला आणि अर्जुनाने विचारले, अर्जुन उवाच ; ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः । तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १७-१ ॥ हे श्रीकृष्ण, जी माणसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विधींचे पालन न करता केवळ स्वतःच्या पद्धतीने श्रद्धायुक्त होऊन पूजा अर्चा करतात, त्यांची स्थिती कोणती? ते सात्त्विक, राजस की तामस? श्रीभगवानुवाच; त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा । सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ १७-२ ॥ सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत । श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ १७-३ ॥ यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः । प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ १७-४ ॥ यावर भगवंत म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय पद्धतीनुसार नसलेली भक्ती हि केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा, सात्त्विक, राजस व...

63) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- नरकाचे महाद्वार:

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 63) नरकाचे महाद्वार: त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥ १६-२१ ॥ एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः । आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ १६-२२ ॥ यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ १६-२३ ॥ तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ १६-२४ ॥ भगवंत पुढे महत्वपूर्ण माहिती अतिशय स्पष्टपणे देतात .... काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे ( नरकाच्या महामार्ग ) आहे आणि म्हुणुनच ज्ञानी मनुष्याने या तिन्हींचा त्याग करावा. हे कौंतेया जो मनुष्य या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला आहे तो पुरुष साहजिकच योग्य असे आचरण करतो आणि परम गती मिळवितो. अर्थात मला येऊन मिळतो. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून मनमानी पद्धतीने वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही किंवा परम गती मिळत नाही. म्हणून मनुष्याने शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून, नीती आणि अनीतीची जण ठेवून काय करावे आणि काय करू नये, हे जा...

62) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण (भाग 2)

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी   62) आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण (भाग 2) इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् । इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ १६-१३ ॥ असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि । ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १६-१४ ॥ आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया । यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १६-१५ ॥ अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः । प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६-१६ ॥ धनप्राप्ती केलेला आसुरी वृत्तीचा मनुष्य माझ्याकडे एवढी संपत्ती आहे व भविष्यातील योजनांच्या आधारे मी त्यात एवढी वाढ करेन व माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेन. माझे हे-हे शत्रू आहेत, मी त्याला मारले आहे ( मी आणि माझे हा कर्ता भाव दुख्खाचे कारण आहे, हे आपण याआधीच समजून घेतले आहे. ) पण आसुरी वृत्तीचा मनुष्य स्वतःला कर्ता मानतो आणि स्वतःला सर्व ईश्वर मानून ( हिरण्यकशयप, रावण, कंस हि या प्रकारच्या आसुरी प्रवृत्तीचा प्रभाव असलेल्या मनुष्यांची काही उदाहरणे आहेत.) मी ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्ध, बलवान आणि सुखी आहे असे मानणारा. स्वतःला मोठा धनिक आणि मोठ्या कुळाचा...

61) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 61) आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् ।  अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम् ॥ १६-८ ॥ एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।  प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ १६-९ ॥ काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।  मोहाद्गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १६-१० ॥ आता भगवंतांकडून आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण कसे करतात ते जाणून घेऊया. भगवंत सांगतात कि आसुरी वृत्तीचे लोक परमात्मा आणि पुरुषोत्तम भगवंताचे अस्तित्व मानत नसल्यामुळे सांगतात की, हे जग असत्य आहे आणि याला कुणाचाही आधार नाही, हे जग कोणतीही दिव्य शक्ती ( परमात्मा ) चालवत नसून केवळ स्त्रीपुरुषांच्या संगमातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच जगनिर्मितीचे नैमित्यिक कारण आहे. त्याशिवाय जगाच्या निर्मितीचे दुसरे काही कारण तथा प्रयोजन नाही. आपल्या या अज्ञानामुळे चुकीचे निष्कर्ष काढत स्वतःच्या नाशाचे निमित्त बनत आसुरी प्रवृत्तीचे अल्पबुद्धी लोक जगासाठी अहितकारक आणि जगाचा विनाशास कारणीभूत होऊ शकतील अश्या कर्मामध्ये रत असतात. अमर्याद आणि अनियंत्रित का...

60) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- मनुष्यामध्ये असलेल्या दोन महत्वाच्या परस्परविरोधी प्रवृत्तीची माहिती

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 60) अध्याय १६ दैवासुरसंपद्विभाग योग- मनुष्यामध्ये असलेल्या दोन महत्वाच्या परस्परविरोधी प्रवृत्तीची माहिती भूमिका श्री भगवान कृष्णाचे मार्गदर्शन असलेली गीतरचना श्रीमदभगवद्गीता आता अतिशय सहज आणि टप्याटप्याने पुढे जात आहे, भगवंत सहज सुलभ आपणासर्वांना पार्थ रूपात मार्गदर्शन देत आहेत. आपण पाहिले कि कश्या प्रकारे भगवंतांनी जगाची उत्पत्ती, भगवंताचे ऐश्वर्य, त्यानंतर विराट विश्वरूप दर्शनानंतर, भक्तियोग, त्यानंतर प्रकृती पुरुष आणि चेतना याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या टप्प्यात भगवंतनी आधी बद्धजीवांना बांधणाऱ्या प्रकृतीच्या तीन गुणासंबंधी मार्गदर्शन, मग स्वतः भगवंत पुरुषोत्तम आणि त्यांची माया याबाबत ज्ञान दिले. दैवी प्रवृत्ती आणि असुरी प्रवृत्ती. याविषयी सविस्तर ज्ञान श्रीभगवानुवाच ; अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः । दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥ १६-१ ॥ अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् । दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥ १६-२ ॥ तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता । भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ १६-३ ...

59) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- जाणून घेऊ भगवंताचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहेत

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-राजेश्वरी 59) जाणून घेऊ भगवंताचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहेत यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् । यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १५.१२ ॥ गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा । पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १५.१३ ॥ अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १५.१४ ॥ सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५.१५ ॥ जीवात्म्याचा विस्मयकारक प्रवास समजावून सांगितल्यावर भगवंत त्यांचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहे ते सांगतात. भगवंत म्हणाले; सर्व जगाला ऊर्जा देणारे आणि प्रकाशित करणारे सूर्याचे तेज माझ्यापासूनच निर्माण होते. चंद्र आणि अग्नीचे तेजही माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे. मीच विविध सृष्टीमध्ये माझ्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो, माझ्यामुळेच समस्त सृष्टी आपल्या कक्षेत स्थिर आहे. इथे सृष्टी मध्ये ग्रह, नक्षत्र, धूमकेतू, तारे तर आहेतच आणि वाचक कल्पना करू शकतात कि ब्रह्मांडातील विविध आकाशगंगांना आपल्या कक्षेत स्थिर ...

59) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- जाणून घेऊ भगवंताचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहेत

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-राजेश्वरी 59) जाणून घेऊ भगवंताचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहेत यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् । यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १५.१२ ॥ गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा । पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १५.१३ ॥ अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १५.१४ ॥ सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५.१५ ॥ जीवात्म्याचा विस्मयकारक प्रवास समजावून सांगितल्यावर भगवंत त्यांचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहे ते सांगतात. भगवंत म्हणाले; सर्व जगाला ऊर्जा देणारे आणि प्रकाशित करणारे सूर्याचे तेज माझ्यापासूनच निर्माण होते. चंद्र आणि अग्नीचे तेजही माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे. मीच विविध सृष्टीमध्ये माझ्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो, माझ्यामुळेच समस्त सृष्टी आपल्या कक्षेत स्थिर आहे. इथे सृष्टी मध्ये ग्रह, नक्षत्र, धूमकेतू, तारे तर आहेतच आणि वाचक कल्पना करू शकतात कि ब्रह्मांडातील विविध आकाशगंगांना आपल्या कक्षेत स्थिर ...

58) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भुतांच्या देहात असणारा हा अक्षय जीवात्मा

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 58) भुतांच्या देहात असणारा हा अक्षय जीवात्मा ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षKति ॥ १५.७ ॥ शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः । गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥ १५.८ ॥ श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च । अधिष्ठायं मनश्चायं विषयानुपसेवते ॥ १५.९ ॥ उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम् । विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १५.१० ॥ यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थि तम् । यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ १५.११ ॥ या सर्व भुतांच्या देहात असणारा हा अक्षय जीवात्मा माझाच अंश आहे प्रकृतीच्या संसर्गामुळे तो प्रकृतीच्या ६ इंद्रियांशी मन आणि पंचेंद्रिये यांच्याशी संघर्ष करत असतो. जसा वारा एखाद्या वस्तूचा गंध स्वतःबरोबर घेऊन जातो तसाच जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतांना, त्या शरीरातून मनासहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. आधुनिक जगात याला रासायनिक प्रक्रियेद्वारे समजने सोपे होऊ शकेल. जसे लिबूं आणि पाणी एकत्र मिसळल्यावर लिंबाचे मूळ रूप व स्...

57) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय १५ पुरुषोत्तम योग प्रारंभ- संसाररूपी शाश्वत वृक्ष

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 57) अध्याय १५ पुरुषोत्तम योग भूमिका १४ व्या अध्यायात भगवंतांनी सुरवातीलाच ( श्लोक ३ ते ५) स्पष्ट केले कि जगाची उत्पत्ती हि माझ्याद्वारे भौतिक प्रकृतीच्या २४ गुणांच्या संगमातून झाली आहे आणि संयोगातून प्रकट होणाऱ्या सर्व जीवांचा बीज प्रदान करणारा परमपिता मीच आहे. भगवंत पुढे सांगतात कि केवळ त्रिगुणच प्रकृतीच्या संयोगातून कर्म करत असतात आणि आत्मा वास्तवात काहीच करत नाही. ( अ. १४. श्लोक १९ ). म्हणजेच कोणताही जीव स्वतः कोणतेही कर्म करत नाही. म्हणजेच मी कर्ता आहे हा भावचं मिथ्या आहे. आणि मी कर्ता नाही तर मग मी कोण आणि जगत कोण हे मुळ प्रश्न वाचकरूपी पार्थाच्या मनात उपस्थित होणे स्वाभाविकच आहे आणि याच प्रश्नाच्या उत्तरांसाठी अध्याय १५ मध्ये भगवंत मार्गदर्शन करतात. "संसाररूपी शाश्वत वृक्ष" श्रीभगवानुवाच ; ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् । छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १५.१ ॥ अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः । अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ १५.२ ॥ श्रीभगवान कृष्ण म्हणाले, आदिपु...