90) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- special episode 4
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 90) अध्याय २ श्लोक ४७ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥२.४७॥ मनस्वास्थ आणि मनःशांतीपूर्वक उन्नतीसाठी भगवंतांनी हा सर्वोत्तम मार्ग संगीतला आहे, ||२.४७|| कि नियत कर्म करणे मनुष्याच्या अधिकारात आहे आणि त्या कर्माच्या फळावर मात्र मनुष्याचा अधिकार नाही. भगवंत स्पष्ट करतात कि कोणताही मनुष्य हा त्याच्या कर्मफलास कारणीभूत नसतो तो केवळ कर्म करू शकतो आणि त्याने स्वतःला कर्म आणि कर्मफळाचा अधिकारी समजून नये तसेच कर्म न करण्याचा विचार सुद्धा करू नये किंवा कर्म न करण्याच्या मोहात सुद्धा पडू नये. ||२.४७|| ।।जय श्री कृष्णा।। धन्यवाद🙏🏻😇 निशा सुजाता राजेश्वर चान्ने भाग 89) special episode 3- अध्याय २ श्लोक ४१ http://nisha-channe.blogspot.com/2021/08/89-special-episode-3.html